Monsoon Maharashtra : मान्सूनची क्षणभर विश्रांती, अर्धा महाराष्ट्र व्यापला : दाब अनुकूल नसल्याने मात्र अडखळला

मान्सून राज्याच्या मध्यभागी अडखळला आहे.
Monsoon covers half of Maharashtra
Published on
Updated on

पुणे : हवेचे दाब वाढल्याने राज्यातील मान्सूनने क्षणभर विश्रांती घेतली आहे. बुधवारपर्यंत त्याने 50 टक्के राज्य व्यापले. मात्र, तो आता मराठवाडा अन् विदर्भात प्रवेश करताच मंदावला आहे. राज्यात सहा जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात यंदा मान्सूनने 10 दिवस आधीच जोरदार मुसंडी मारत विक्रमी वेळेत 25 मे रोजी आगमन केले. 26 रोजी तो मुंबई, पुणे, सोलापूरसह अहिल्यानगरपर्यंत पोहचला, तर 27 रोजी त्याने मराठवाडा, विदर्भात प्रवेश केला. मात्र, तो त्या दोन्ही विभागांच्या वेशीवरच थांबला. कारण, हवेचे दाब अचानक वाढले. त्यामुळे पाऊस अन् मान्सूनचा प्रवासही महाराष्ट्राच्या मध्यावर थांबला आहे.

बांगलादेशात कमी दाबाचा पट्टा

बांगलादेशच्या किनारपट्टीवर गुरुवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ईशान्य भारतातील पाऊस वाढणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. मात्र, तो बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय होईल, असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news