पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल. काँग्रेसचा (इंडिया आघाडी) जाहीरनामा आणि दिलेल्या गॅरंटीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने भाजप अस्वस्थ झाले आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात वेगळेच मुद्दे मांडत आहेत. ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे. परंतु, ते हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. चीन आपला भूभाग बळकावत आहे, त्यावर ते काही बोलत नाहीत.