![सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद : खासदार सुप्रिया सुळे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Fsupriya-sule-1-e1695521099966.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गँगची दहशत सुरूच आहे. कोयता गँगला पुन्हा डोके वर काढू देणार नाही, असे सांगितले जाते. तरीदेखील कोयता गँगची दहशत पुणे परिसरात कायम आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचे अपयश असल्याचीही टीकाही त्यांनी केली. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रविवारी (दि. 14) सुळे आल्या होत्या. अभिवादनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेली गोळीबाराची घटना ही धक्कादायक होती. मुंबईसारख्या ठिकाणी भररस्त्यावर अशाप्रकारे गोळीबार होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे 'अबकी बार, गोळीबार सरकार' या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
हेही वाचा