

Khadakwasla dam water storage 99.94%
खडकवासला: धरण क्षेत्रासह घाट माथ्यावर शुक्रवारी (5) सकाळपासून रिमझिम सुरू आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेल्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जोरदार पाऊस पडत नसला, तरी रिमझिमीने पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे जादा पाणी सोडुनही सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत जवळपास शंभर टक्के म्हणजे 99.94 टक्के पाणीसाठा स्थिर आहे.
खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर - फुटाणे म्हणाल्या की, पावसाचा जोर ओसरूही खडकवासला साखळी यंदा लवकर शंभर टक्के भरली. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी धरण साखळीत शंभर टक्के साठा झाला होता. चारही धरण क्षेत्रात उघडीपी नंतर रिमझिम सुरू आहे पाण्याची आवक सुरु असल्याने सोडण्यात येत असलेल्या पाण्याची तुट भरुन सर्व धरणे शंभर टक्के भरुन वाहत आहेत. (Latest Pune News)
शुक्रवारी दिवसभरात पानशेत येथे 7, वरसगाव येथे 7 , टेमघर येथे 9 आणि खडकवासला येथे 2 मिलीमीटर पाऊस पडला. सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीत 2 हजार 140 व मुठा कालव्यात 750 क्युसेक पाणी सोडले जात आहे, तर पानशेतमधून 600, वरसगावमधून 600 आणि टेमघरमधून 509 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
शुक्रवाराचा पाणीसाठा
29.13 टीएमसी (99.94 टक्के)