बारामती तालुक्याच्या जिरायती भागातून वाहणारी कर्हा नदी यंदाच्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहिलीच नाही. या नदीवरील नाझरे धरण काही दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने 100 टक्के भरले. धरणाच्या सांडव्यातून काही प्रमाणात पाणी नदीत सोडण्यात आले. यामुळे काही काळ नदीला पाणी होते. मात्र, हे पाणी आता कमी झाले आहे.
यंदा पाऊस पुरेसा न झाल्याने कर्हा नदीत सोडलेले पाणी नदीतील खड्ड्यात साठले आहे. आता पावसाळा संपला असल्याने नदीला पाणी येण्याची शक्यता नाही. नदीकाठावरील शेतकर्यांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.