यंदाच्या दिवाळीत शहरातील वायुप्रदूषणाने कळस गाठला होता. दिल्लीपाठोपाठ पुणे शहराने नंबर लावत देशात सर्वाधिक प्रदूषित दिवाळीची नोंद केली. शहरातील हवेची गुणवत्ता लक्ष्मीपूजनाच्या दुसर्या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी अतिखराब गटात गेली होती. त्यामुळे दिवाळीतच अनेक जण आजारी पडले. घसा खवखवणे, डोळ्यांची आग व खाज सुटणे, नाक चोंदणे, पाणी गळणे असे त्रास सुरू झाले. अनेकांनी दिवाळीतच दवाखाना गाठला. मात्र, तो त्रास पंधरा दिवस होत आले, तरी थांबता थांबेना, असे मत शहरातील डॉक्टारांंनी व्यक्त केले. फटाक्यांच्या धुरामुळे ज्येष्ठ नागरिकांना न्यूमोनियासारख्या आजारांनी ग्रासल्याने त्यांना वारंवार दावाखान्याच्या वार्या कराव्या लागत आहेत.