दडपशाहीविरोधात आवाज उठविला पाहिजे: डॉ. बाबा आढाव

महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त मौन सत्याग्रह
Pune News
दडपशाहीविरोधात आवाज उठविला पाहिजे: डॉ. बाबा आढाव Pudhari
Published on
Updated on

पुणे: 1920 च्या सुमारास राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आफ्रिकेतून भारतात आल्यावर त्यांनी आधी भारत जाणून घेतला. त्यानंतर ब्रिटिशांविरोधात अहिंसक मार्गाने विविध लढे दिले, तुरुंगवास पत्करला आणि सरते शेवटी ‘करा अथवा मरा’ हा मंत्र भारतीयांना दिला. त्यातून झालेल्या जनतेच्या उठावामुळे भारत स्वतंत्र झाला. आज भारतीयांच्याच राज्यात चाललेल्या दडपशाहीविरुद्ध या मंत्राचा पुन्हा जागर केला पाहिजे, तरच सध्याच्या सरकारच्या गैरकारभारातून सुटका मिळेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने मौन सत्याग्रह करण्यात आला. त्यात डॉ. आढाव हेही सहभागी झाले. सत्याग्रहाच्या समारोपावेळी ते बोलत होते. मौन सत्याग्रहात विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभाग घेतला.

या वेळी माजी आमदार उल्हास पवार, जनआंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयाच्या सुनीती सु. र., इब्राहिम खान, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी, हमाल पंचायतीचे गोरख मेंगडे, मोहन चिंचकर, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता काळेबेरे व सरचिटणीस शारदा वाडेकर, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मोहन जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी 11 वाजल्यापासून मौन सत्याग्रहाला सुरुवात झाली. उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news