सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तापमानात किंचित घट झाली आहे. पण उकाडा कायम आहे. भारनियमनामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास वाढला आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
मार्च महिन्यापासून जिल्हा उन्हाच्या तडाख्याने भाजून निघत आहे. एप्रिल महिन्यात तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यातच भारनियमन सुरू झाल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे पिकांची होरपळ होत आहे. गेल्या आठवड्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. 41-42 पर्यंत गेलेला पारा 38 अंशापर्यंत कमी झाला आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ बनले आहे.