पवना धरणात 47 टक्के पाणीसाठा

पवना धरणात 47 टक्के पाणीसाठा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणामध्ये आजअखेर 3.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पुढील साडेचार महिने पुरेल असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा कमी आहे.

मावळसह पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून पवना धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.51 टीएमसी आहे. पवना धरणाची पाणीपातळी 4995.80 दसलक्ष घनफूट आहे.

सद्यस्थितीत धरणामध्ये 47 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी आज अखेर धरणामध्ये 52 टक्के पाणीसाठी शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाच टक्यांनी पाणीसाठा कमी आहे.

एप्रिल महिना सुरू झाला असून शहरामध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला असून सद्यस्थितीत नागिरकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.

शहरासाठी पवना धरणातून 480 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधार्‍यातून ते पाणी उचलून शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तर एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते. असे दररोज 510 एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते.

शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता शहरासाठी आंद्रा व भामा-आसखेड येथून पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सद्यस्थितीत मिळणार्‍या 510 एमएलडी पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news