Nashik Trimbakeshwar | जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा।।

Trimbakeshwar । 50 हजार वारकऱ्यांसह संत निवृत्तिनाथ पालखी आषाढीसाठी मार्गस्थ; आज सातपूरमध्ये पालखी दाखल होणार
त्र्यंबकेश्वर (नाशिक)
त्र्यंबकेश्वर : विठूनामाचा गजर करीत निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले हजारो वैष्णव नाथांच्या पादुकांना कुशावर्त तीर्थावर अभिषेक केल्यानंतर त्र्यंबकराजासमोर वारकऱ्यांनी कीर्तन सेवा केली. पुष्पांनी सुशोभित केलेला चांदीचा रथ अन् त्यापाठी चालणारा वारकऱ्यांचा जत्था यामुळे त्र्यंबकनगरीत भक्तिचा मळा फुलला होता. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : टाळ - मृदंगाच्या गजरात विठूनामाचा गजर करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरकडे मंगळवारी (दि. १०) मार्गस्थ झाली. हजारो वारकरींची मांदियाळी, महिलांच्या डाईवर तुळशी वृंदावन, पुरुषांच्या खांद्यावर भगव्या पताका अन् मुखी संत तुकारामरचित ‘जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा’ या अभंगाच्या उच्चाराने अवघे वातावरण भारावून गेले होते. आगामी २७ दिवसांत सुमारे ४०० किलोमीटर अंतर कापून हा भक्तीसागर पांडुरंगाच्या चरणी दाखल होणार आहे.

Summary
  • पालखी दृष्टीक्षेपात

  • ४८० किमी अंतर कापणार २७ दिवसांत

  • ५५ दिंड्या यंदा पालखी सोहळ्यात सहभागी

  • शासनाकडून पालखीसोबत रुग्णवाहिका, पाणी टँकर, मुक्कामस्थळी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था.

नाशिक
काय महिमा वर्णावा... नाशिक : 'धन्य धन्य निवृत्ती देवा । काय महिमा वर्णावा ।। शिव अवतार तूच धरून । केले त्रैलोक्य पावन ।। समाधी त्र्यंबक शिखरी । मागे शोभे ब्रह्मगिरी।।' या अभंगाची प्रचिती देणारा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा अद्भुत पालखी सोहळा मंगळवारी (दि. 10) हजारो भाविकांनी अनुभवला. टाळ-मृदंगांचा गजर आणि विठू नामाच्या घोषात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखीचे प्रस्थान आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने झाले. यावेळी वारकऱ्यांच्या गर्दीने देवनगरी दुमदुमून गेली होती.(छाया : हेमंत घोरपडे)

परंपरेनुसार संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने मंगळवारी (दि. २) दुपारी २ वाजता पंढरपुर मार्गावर प्रस्थान ठेवले. तत्पूर्वीच दिंड्या आणि वारकऱ्यांचा जत्था त्र्यंबकनगरीत दाखल झाला होता. तीन वाजेच्या दरम्यान तीर्थराज कुशावर्तावर पालखीचे आगमन झाले. याठिकाणी नाथांच्या पादुकांची महापूजा झाली. तेथून पालखी रथ त्र्यंबकराजासमोर दाखल आला. येथे वारकर्‍यांनी अभंग सेवा रुजू केली. पालखी प्रस्थानासाठी मानकरी, माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली होती. पुढील प्रवासासाठी प्रगतशी शेतकरी सचिन शिखरे, विसापूरचे निवृत्ती भुजाडे, मातोरी येथील मातुलेश्वर भजनी मंडळ यांच्या तीन बैलजोड्या असतील. चांदीच्या रथाला दरवर्षीप्रमाणे कैलास माळी आणि रवींद्र माळी यांनी स्वखर्चाने आकर्षक पुष्पांनी सजावट केली आहे. २७ वर्षांपासून ते सजावट करतात. पालखीपाठोपाठ मानाच्या दिंड्यांनी वारीला प्रारंभ केला. यामध्ये मोहन महाराज, हभप बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, डावरे महाराज, जयंत महाराज गोसावी यासह वारकरी सहभागी झाले आहेत.

Nashik Latest News

प्रस्थानासाठी समाधी मंदिर संस्थान अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख नवनाथ गांगुर्डे, विश्वस्त कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, नीलेश गाढवे, नारायण मुठाळ, माधव महाराज राठी, योगेश गोसावी, भानुदास गोसावी, राहुल साळुंके यासह विश्वस्त तसेच मानकरी उपस्थित होते. सर्व मानकरी दिंडी चालक यांचा नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षी जवळपास ५० हजार वारकरी दिंडीत सहभागी झाले असून, त्यात महिला, त्यातही वृद्धांची लक्षणीय संख्या दिसून आली.

त्र्यंबकेश्वर (नाशिक)
निवृत्तीनाथा चरणी! शरण एकाजनार्दनी! नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी साेहळ्याचे मंगळवारी (दि. 10) पारंपारिक पद्धतीने टाळ- मृदूगारच्या गजरात आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यामुळे त्र्यंबकनगरी वारकऱ्यांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. शेकडो महिलांनी डोक्यावर तुळशीपात्र घेत वारीत सहभाग घेतला. यानिमित्ताने रंगलेल्या पहिल्या रिंगण सोहळ्यात अश्वनृत्याने वारकरी भारावून गेले होते. (छाया : हेमंत घोरपडे)

वरुणराजाची अनुपस्थिती

दरवर्षी आषाढीसाठी वारी मार्गस्थ होताना त्र्यंबकनगरीवर हमखास पर्जन्यधारा कोसळतात. यंदामात्र वरुणराजाची अनुपस्थिती वारकऱ्यांना जाणवली. त्यानंतरही उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मंगलवाद्य आणि हरीनामाचा गजर करत पालखी, मध्यभागी नगारा असलेली बैलगाडी अन् त्यापुढे पदन्यास करणारे अश्व असे दृष्य टिपण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती.

दोन किमीवर पडला पहिला मुक्काम

नियोजनानुसार, पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकपासून दोन किमीवरील पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यात पडला. सायंकाळच्या सुमारास वारकरी येथे विसावले. शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बुधवारी पालखी सातपूरमध्ये दाखल होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news