सप्तशृंगगड | नाशिक कळवण महामार्गावरील कोल्हापूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आदिवासी संघटनेने आंदोलन केले. पेसा क्षेत्र भरतीवरील स्थगिती उठवा या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको केला. शासनाच्या निर्णयाविरोधात रास्ता रोको करून कळवण नाशिककडे जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे सर्व गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहावयास मिळत आहेत.
आदिवासी बांधवांचा अंत बघू नका, नोकरी आमच्या हक्काची पेसा क्षेत्राची भरती झालीच पाहिजे, कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कळवण महामार्गावरील प्रांत कार्यालया ठिकाणी पेसा भरती करा या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्ष कळवण तालुका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सर्व आदिवासी संघटना तसेच आदिवासी पत्रकार बांधव आंबेडकर विचार मंच कळवण यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.