लासलगाव : राज्यातील बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार हे समित्यांच्या अडचणी समजून न घेता निघून गेल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ७) राज्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. या बंदमध्ये लासलगावसह जिल्ह्यातील एकूण १५ बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले.
राज्यातील बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार हे समित्यांच्या अडचणी समजून न घेता निघून गेल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ७) राज्यातील बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील १५ बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगावसह अन्य बाजारातही कांदा व धान्याचे व्यवहार पूर्णत: बंद होते. भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकसह लासलगाव येथे भाजीपाल्याचे लिलाव पार पडले. तर या ठिकाणी काळ्या फिती लावून लिलाव करण्यात आले.
लासलगावसह अन्य बाजारांतही कांदा व धान्याचे व्यवहार पूर्णत: बंद होते. भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकसह लासलगाव येथे भाजीपाल्याचे लिलाव पार पडले.
राज्य कृषी पणन मंडळ आणि राज्य बाजार समिती संघाच्या वतीने पुणे येथे अलीकडेच आयोजित परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार हे बाजार समित्यांना भेडसावणारे प्रश्न ऐकून न घेताच निघून गेल्याचा आक्षेप आहे. पणनमंत्र्यांनी बाजार समित्यांचे प्रश्न ऐकून न घेण्याची वादग्रस्त भूमिका घेतली. याचा निषेध करण्यासाठी राज्यभर बंद पाळण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला होता. सोमवारी बंदमध्ये जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे सर्व व्यवहार थंडावले. लासलगाव बाजार समितीसह उपबाजारात कांदा व धान्याचे व्यवहार बंद होते. सध्या बाजार समितीत प्रतिदिन १० हजार क्विंटल आवक होते. दैनंदिन उलाढाल तीन ते चार कोटी रुपये असते. ही उलाढाल पूर्णत: थांबली होती. लासलगावसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.