![crime news](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F83bffa19-80c0-4fa4-b85d-65173bc3fa5a%2Fd37e6490-5e98-44a1-a9ef-ab2ebf0d1ead.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : किरकोळ कारणावरून मजुरांमध्ये झालेल्या वादात एकाने विळ्याने वार करून एका युवकास गंभीर जखमी केल्याची घटना दि. 23 रोजी रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथे ही घटना घडली.
मजुरांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेला वाद टोकाला गेला.
एकावर विळ्याने वार केल्याने तो जखमी झाला.
याबाबतचे वृत्त असे की, रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील प्रिंपी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरलेल्या वाहनाचे वजन करण्याच्या कारणावरून विकी यशवंत वाघ रा. आहिरवाडी व रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत जाऊन विकी याने रियाज (वय १८) यास मानेवर विळ्याने मारून प्राणघातक हल्ला केला. तसेच गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी फिर्यादी सबदर तडवी व रियाज यास चापटा बुक्यांनी मारहाण केली.
या बाबत सबदर हैदर तडवी रा. भोकरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत.