नंदूरबार : तापी नदीकाठावरील गावांनी सतर्कतेता बाळगावी - जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नदीकाठावरील ग्रामस्थांनी सर्तकता बाळगा - जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठीpudhari file photo
Published on
Updated on

नंदुरबार - तापी नदी कॅचमेंट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या नागरिक व गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पावसामुळे हतनूर धरणातुन पाण्याचा विसर्ग असून धरणाचे १६ गेट १.५ मीटरने उघडले आहेत. ७०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. तसेच सोमवार (दि.14) रोजी सकाळी ९.०० वाजता १८ गेट १.५ मीटरने उघडण्यात आले असुन ८०००० ते १००००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात हतनुर धरणाातुन सोडण्यात येणार आहे.

सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज मध्ये ४८००० क्युसेक पाण्याचा सोडणे सुरु असुन सांरगखेडा बॅरजचे ४ गेट ३ मिटरने उघडले असुन ४५७६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे, प्रकाशा बॅरेजचे ५ गेट ३ मीटरने उघडले असुन ५०३५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक लक्षात घेता पुढील काही तासात सांरगखेडा व प्रकाशा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात येईल.

सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याात येत आहे. तापी नदीकाठावरील नागरीकांनी आपले गुरे व प्राणी नदी काठावर सोडू नये तसेच पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी ठेवावे. नागरीकांनी तापी नदी काठाजवळ जावू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news