जळगाव : नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह शनिवार (दि.24) जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करत हे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहे. शनिवार (दि.24) रोजी रात्रीच वरणगाव येथे 14 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. सुरेश (राजूमामा ) भोळे आमदार संजय सावकारे,आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संबंधित अधिकारी आदींनी यावेळी उपस्थित राहत कुटुंबाचे सांत्वन केले.
नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे. तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच 16 लोकांवर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. बसमध्ये वाहक आणि चालकांसह एकूण 43 जण होते. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील आहेत.
प्रकाश नथ्थू कोळी (सुखडे), तळवेल. रोहिणी सुधाकर जावळे, (वरणगाव). पल्लवी संदिप सरोदे, (वरणगाव), अनिता अविनाश पाटील (दर्यापूर). सरोज मनोज (भिरुड), जळगाव/तळवेल, सुलभा पाडुरंग भारंबे, (भुसावळ). गणेश पाडुरंग भारंबे, (भुसावळ). मिनल गणेश भांरबे, (भुसावळ). परी गणेश भारंबे, (भुसावळ). विजया कडू जावळे, (वरणगाव). निलिमा चंद्रकांत जावळे, (वरणगाव). संदिप राजाराम सरोदे, (वरणगाव). तुळशिराम बुधा तायडे, (तळवेल). सुहास प्रभाकर राणे, (तळवेल). निलिमा सुनिल धांडे, (भुसावळ). भारती प्रकाश जावळे, (वरणगाव), सागर तडु जावळे, (वरणगाव). आशा समाधान बाविस्कर, (तळवेल). सरला तुळशिराम तायडे, (तळवेल). अनुप हेमराज सरोदे, सरला सुहास राणे, (तळवेल). पंकज भागवत भंगाळे, (वरणगाव). मंगला विलास राणे, (तळवेल). रिंकु चंदना सुहास राणे, (तळवेल). सुधाकर बळीराम जावळे, (वरणगाव).