Jalgaon : जिल्ह्यातून युवा लेखकाला दिल्लीहून सन्मान

भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रवीण नायसे
भुसावळचे सुपुत्र आणि युवा लेखक प्रवीण नायसेPudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : भुसावळचे सुपुत्र आणि युवा लेखक प्रवीण नायसे यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन समारंभासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणामुळे भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रवीण नायसे यांची निवड पंतप्रधान युवा मेंटारशिप योजनेअंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यासामार्फत करण्यात आली होती. महाराष्ट्रातून फक्त चार युवकांची या योजनेसाठी निवड झाली होती, त्यामध्ये नायसे यांचा समावेश होता.

राष्ट्रपती भवनात पुस्तक प्रकाशित

त्यांनी लिहिलेले "आद्यक्रांतीवीर उमाजी राजे नाईक" हे पुस्तक २०२३ मध्ये राष्ट्रपती भवनात प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, या पुस्तकाचे भारत सरकारतर्फे देशातील प्रमुख भाषांमध्ये भाषांतरही करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिन समारंभासाठी दिल्लीहून मिळालेले सरकारी निमंत्रण हा केवळ प्रवीण नायसे यांचा गौरव नसून, संपूर्ण भुसावळ आणि जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news