जळगाव : प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने शहरातील सोयी सुविधांचा बोजवारा उडत आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही येथील रस्ते पावसाळ्यात पावसाने वाहून गेले आहेत. तर खड्ड्यांमधून रस्ता शोधत वाहनधारकांना मार्ग काढवा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यावर लाल कपडा लावून धोक्याची घंटा दाखवली जात आहे. जबाबदार प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करत जबाबदारी झटकत आहेत.
देशाचे राज्य परिवहन विभागाचे मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार देशातील प्रत्येक राज्य जोडण्यासाठी व वाहतूक अधिक सुरक्षित होण्यासाठी रस्त्यांचे चौपदरीकरण व दुपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र राज्यासह जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून प्रशासकीय यंत्रणाही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते कालिका माता मंदिर हा रस्ता शहरातून ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारकांना खड्ड्यांमधून रस्ता शोधावा लागत आहे.
भुसावळ कडून जळगाव कडे येणाऱ्या रस्त्याची सुरुवातच खड्ड्यांनी होत आहे तर कालिका माता मंदिरासमोरील वळणावरच मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने संभाव्य अपघाताची शक्यत आहे. डॉक्टर उल्हास पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या समोर असलेल्या त्रिफुलीजवळ देखील मोठ्ठा खड्डा झाल्याने संभाव्य अपघाताची शक्यता असल्याने येथे लाल कपडा लावून धोक्याची घंटेचा निर्देश करण्यात आला आहे.
शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नाही तर दुय्यम अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी भारतीय प्राधिकरण केली असता त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NAHI) कडे रस्त्याचे काम असल्याचे सांगितले. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NAHI) जळगाव विभागाचे संचालक व अभियंता शिवाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला एनओसी देण्यात आलेली असून खड्डे व दुरुस्तीचे कामे दोन्ही विभागाकडून संयुक्तिकरीत्या केली जाणार आहेत.