जळगांव : जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असलेले हातनूर धरणात दि. 7 रोजी पाणलोट क्षेत्रामध्ये 314 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे हातनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने सकाळी 11 वाजता दहा गेट एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामधून 19105 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काही तासात हा विसर्ग पंचवीस ते तीस हजारापर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरणावर रेल्वे दीपनगर भुसावळ नगरपालिका औद्योगिक वसाहत याच्यासह सिंचन काही अजून जिल्ह्यातील नगरपालिका यांना पाणीपुरवठा होतो. पावसाळा सुरू होऊन बरेच कालावधी होऊनही हातनुर धरणात पाण्याची आवक होत नव्हती. दि.7 रोजी हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 314 मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे हातनुर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. सकाळी नऊ वाजता 4 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून 7628 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यावेळेस हातनुर धरणात 55.67 टक्के पाणीसाठा होता. सकाळी दहा वाजता सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून 11442 क्युसेस पाणीसाठा नदीत सोडण्यात येतोय तर पाणीसाठा 55.9 टक्के होता. तर सकाळी 11 वाजता दहा दरवाजाने एक मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीच्या पात्रात १९१०५ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे व सध्याला धरणात 56.29 टक्के पाणीसाठा आहे.
बराणपुर 6.6 देड तलाई2.4 पेक्षा 0.6 एरंडी 14.8 गोपाल खेडा १०७.६ लखपुरी 16.8 लोहटार 78.2 अकोला 67.8 एकूण 314 मिलिमीटर पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला आहे तर हातनुर धरण परिसरामध्ये 18 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे ४१ पैकी 10 गेट १.०० मी. उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत १९१०५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासांत २५,००० ते ३०,००० क्युसेक पर्यंत विसर्ग हातनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.