जळगाव | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे एका महिलेला चाकूने वार करून खून केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आली आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे सोनाली महेंद्र कोळी ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास महिलेचे गावात राहणारा सागर रमेश कोळी (वय – २८) याच्यासोबत भांडण झाले या रागातून सागर कोळी याने हातात असलेला चाकूने पाठीवर पोटावर वार करून सोनाली कोळी या महिलेचा खून केला. तसेच दोघांचे भांडण सुरू असताना विनोद सुभाष कुंभार (वय -२८) हा भांडण सोडवण्यासाठी आला असता. त्याच्या हातावर देखील वार करून तो “आमच्या मधात येऊ नकोस नाहीतर तुला ठार मारून टाकेल” असा दम दिला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि पथक घटनांसाठी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला. गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता संशयित आरोपी सागर रमेश (वय-२८) राहणार साकेगाव याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.