

जळगाव : हतनूर धरण हे मोठे व सिंचनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे धरण असून दररोज 25 दलघमी असे बाष्पीभवन पाण्याचे होत आहे. पारा 38 ते 40 च्या दरम्यान असल्याने दररोज 25 दलघमी असे बाष्पीभवन होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक्यातील हातनुर धरण हे औद्योगिक ऑर्डनन्स फॅक्टरी विज निर्मिती दीपनगर सिंचन रेल्वे व नगरपालिकेला पाणीपुरवठाच्या दृष्टीने पाण्यासाठी महत्वपूर्ण स्त्रोत आहे. या धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती अवलंबून आहे शेती साठी सिंचन लागणारे पाणी देखील धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहे.
हतनूर धरणाच्या सोमवार, 10 मार्च 2025 रोजी पाण्याची पातळी 212.550, साठा 306.50 जिवंत साठा 173.50, टक्केवारी 68.4 अशी आहे.
2024 मध्ये हतनूर धरणाचे 10 मार्च 2024 रोजी २१२.६९० साठा 312.60 जिवंत साठा 179.60 व टक्केवारी 70.43 होती.
गेल्या वर्षीपेक्षा पाणी पातळी 0.14 मिलिमीटरने कमी होता. साठा 6.1 ने जिवंत साठा पण 6.1 ने तर टक्केवारी 2.39 ने कमी यावर्षी आहे.
2025 मध्ये एक मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे बाष्पीभवन 25 ते 26 दलघमी होत आहे. हेच बाष्पीभवन बुधवार, दि. 5 मार्चला 22 दलघमी झालेले आहे.
तर 2024 मध्ये मार्च महिन्यात 1,6,8,9 रोजी 0.21 दलघमी तर दोन मार्चला 0.05 दलघमी पाण्याची बाष्पीभवन झाल्याची नोंद आहे.
2024 या वर्षात 1 मार्च 0.21,2 मार्च 0.05, 3 मार्च 0.11, 4 मार्च 0.16, 5 मार्च 0.26, 6 मार्च 0.21,7 मार्च 0.26,8 मार्च 0.21,9 मार्च 0.21, 10 मार्च 0.26
2025 या वर्षात 1 मार्च 0.26, 2 मार्च 0.25, 3 मार्च 0.25, 4 मार्च 0.25, 5 मार्च 0.22, 6 मार्च 0.25, 7 मार्च 0.25, 8 मार्च 0.25, 9 मार्च 0.25, 10 मार्च 0.25 याप्रमाणे बाष्पीभवन धरणातील पाण्यातून होत आहे
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 22 ते 26 दलघमी बाष्पीभवन होत आहे
यामध्ये रब्बी हंगामासाठी चार आवर्तने धरणातून देण्यात येणार आहे तर बिगर सिंचनासाठी दोन आवर्तने झालेली आहे उर्वरित आवर्तने मागणीवर अवलंबून राहणार आहे.