पिंपळनेर : भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच गुजरात यांच्या वतीने नाशिक येथे तिसरे राष्ट्रीय कविसंमेलन व महाराष्ट्र नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पिपंळनेच्या रुपाली चौधरी हिला महाराष्ट्र नारीशक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले.
या राष्ट्रीय कविसमेलानाच्या समेलनध्यक्षा प्रा. सुमती पवार अध्यक्षस्थानी होत्या तर उद्घघाटक म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे हे होते. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ३४ नारीशक्तीना पुरस्कार देण्यात आला. यात धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावातील वक्तृत्वाची हिरकणी म्हणून ओळख असलेली कुमारी रुपाली चौधरी हिचे सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील अनेक नामवंत कवी-कवयित्री उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शरद चीतोडकर, जगदीश कोठावदे, अमृता दहिवेलकर, प्रा.विनोद दशपूते, डॉ.राहुल येवले, प्रा.भागवत महालपुरे, गिरीश वाणी, मां.मधुकर ब्राम्हणकर उपस्थित होते.