श्रीरामपूरः श्रीरामपूर शहरासाठी मंजूर केलेल्या 1, 78 कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, ही योजना महत्त्वाची असल्याने, कामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
श्रीरामपुरातील पालिकेच्या अधिकार्यांसोबत पाणी पुरवठा योजनेची पाहणी करून, कामांची माहिती घेतली. 2051 सालापर्यंत वाढ होणार्या लोकसंख्येचा अंदाज लक्षात घेऊन, 26.36 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले आहे. दगडी सोलिंग व क्रॉकींगचे काम प्रगतीपथावर आहे. वितरणासाठी 59 किलो मीटर पाइपलाइनपैकी 17 किलो मीटर पाइप लाइन टाकली आहे.
तलावाचे सर्वेक्षण व बोअर कोअर चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. खोलीकरणाचे काम लवकरचं सुरू होणार आहे. तलावातील आरसीसी कामानंतर तळाचा थर प्लास्टिक शीट व वाळूने तयार करण्यात येणार आहे.
या कामासाठी साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी लागेल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही योजना महत्त्वाची आहे. कामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले. नागरी सुविधांसंदर्भात सामाजिक भावना लक्षात घेऊन, जबाबदारीने काम पूर्ण करावे, आवाहन त्यांनी अधिकार्यांना केले.