
महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर राहुरी मतदारसंघाचे आतापर्यत बाबूरावदादा तनपुरे, पी.बी. कडू, का.ल. पवार, प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, शिवाजीराव कर्डिले व प्राजक्त तनपुरे आदी सात व्यक्तींनी विधानसभेत प्रतिनिधीत्त्व केले आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवारांच्या भवितव्याचा सोमवारी (दि.4) निर्णय होत आहे. या सात उमेदवारांपैकी आता कोणती आठवी व्यक्ती विधानसभेत पोहोचणार आहे याची उत्सुकता राहुरीकरांना लागली आहे.