मराठीचा न्यूनगंड नको, भाषेची ताकद ओळखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठीचा न्यूनगंड नको, भाषेची ताकद ओळखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मुंबईत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे पार पडलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी संवाद साधत म्हणाले की, मुंबईसाठी मराठी माणसांनी बलिदान दिलंय, मुंबईसाठी शिवसेना कायम लढली. विरोधकांना खोचक टोला लगावत ते पुढे म्हणाले की, फक्त चर्चा करून इतिहास घडत नाही. असा इतिहास विसरतात, त्याला भविष्य नसतं. विकासासाठी ठोस निर्णय हे घ्यावेच लागतात.

मराठी भाषेची सक्ती कराव लागणं हे दुर्दैवं आहे, भाषा शिकणं हा गुन्हा नाही, मराठीचा न्यूनगंड नको. मराठी भाषेची ताकद ओळखा असं म्हणत सरकारी कारभार मराठीतच चालला पाहिजे, भाषा ही संस्कतीची ओळख आहे. भाषिक अत्याचार खपवून घेणार नाही असं मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं. .

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news