गोविंद पानसरे हत्या प्रकरण: आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Govind Pansare Murder Case | आरोपींना २०१८ ते २०१९ दरम्यान अटक
Govind Pansare Murder Case
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय आज (दि.२९) दिला. (Govind Pansare Murder Case)

अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच होते. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर केल्याचे हायकोर्ट म्हटले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला. न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी विरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news