

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय आज (दि.२९) दिला. (Govind Pansare Murder Case)
अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच होते. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर केल्याचे हायकोर्ट म्हटले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला. न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी विरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.