यावर सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, आम्हीही सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. त्यात आम्ही विनंती केली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीमध्ये अजित पवार गटाला दिलेल्या निर्देशातील शेवटची ओळ काढून टाकावी. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. एकदा प्रक्रिया सुरू झाली असताना त्यात आता बदल करण्यासाठी तुम्ही विनंती कशी करू शकता? त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विचारणा केली की तुम्ही आतापर्यंत किती जाहिराती दिल्या आहेत आणि त्या जाहिरातींमध्ये नक्की काय मजकूर आहे या संदर्भातला तपशील सर्वोच्च न्यायालयाला कळवावा, अशा सुचना दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा दोन्ही बाजूंचे हे अर्ज सविस्तर ऐकणार असल्याचे सांगितले.