कोकणात चालत आलेल्या पूर्वपार परंपरेनुसार आजही होळीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फांद्या वापरून होळी उभारून पूजा केली जाते ह्या मध्ये मुखयतहा भेंडी, एरंडेल, अंबा, केळी आणि इतर झाडांच्या फांद्यांनाचा वापर केला जातो होळीच्या आधी येणाऱ्या पंचमी पासून होळीच्या नंतर येणाऱ्या पंचमी पर्यंत होळी पेटत ठेवण्याची प्रथा आहे.आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यासाठी होळी जवळ येऊन अनेक जण गाराणे घालत असतत तर इच्छा पूर्ण झाल्यावर अनेक जण येऊन आपल्या मनानुसर कोंबडया, बोकड आणि असंख्य साड्या चोळ्या होळीला भेट देऊन जातात.जमलेल्या सर्व साड्या होळी नंतर आदिवासी पाड्यातला गरीब महिलांना दरवर्षी दान केल्या जातात.