छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वीच इंडिगो विमानाचे पार्किंग ब्रेक फेल झाल्याने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे येणारे विमान तब्बल साडेपाच तास ३ झाले होते. वैमानिकांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अपघात टळला होता. बुधवारीही काही तांत्रिक करणमुळे हे विमान दोन तास उशीरा आले.
इंडिगोचे मुंबई छत्रपती संभाजीनगर विमान संध्याकाळी 6.40 वाजता येवून सायंकाळी 7.30 वाजता मुंबईकडे रवाना होते. बुधवारी (दि. १३) हे विमान रात्री 9 वाजता चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले आणि 9.30 च्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. संध्याकाळचे इंडिगोचे विमान गेल्या चार ते पाच दिवसांपासून लेट होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.