Thackeray vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? : अरविंद सावंत
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीकेचे झोड उठविली जाऊ लागली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. Thackeray vs Devendra Fadnavis
अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, त्यांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? सर्व घाणेरडे कपडे त्यांच्या लॉन्ड्रीमध्ये आले आहेत. आणि त्यांनी धुतले आहेत. त्यांना आता नैतिक अधिकार आहेत का?. देशभक्ती, राष्ट्रवाद, त्यांच्या अंत:करणात काहीही नाही, फक्त सत्तेसाठी त्यांचे प्रेम असून भाजपचा हा ढोंगीपणा आहे, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. Thackeray vs Devendra Fadnavis
#WATCH | On Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis’s letter to NCP leader Ajit Pawar, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, “Does he have the moral right to write a letter? All dirty clothes have come to their laundry and they have washed them. What moral rights does he… pic.twitter.com/WqrCPB0JQZ
— ANI (@ANI) December 8, 2023
हेही वाचा
- Maharashtra Assembly Winter Session : डार्कनेटद्वारे ऑनलाईन लूट, चुकीच्या स्किममध्ये गुंतवणूक करू नका – फडणवीस
- Ajit Pawar On Devendra Fadnavis | नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच फडणवीसांच्या पत्राला उत्तर- अजित पवार
- Devendra Fadnavis on Nawab Malik : नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही : फडणवीसांचे अजित पवारांना पत्र