Thackeray vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? : अरविंद सावंत | पुढारी

Thackeray vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? : अरविंद सावंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीकेचे झोड उठविली जाऊ लागली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. Thackeray vs Devendra Fadnavis

अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, त्यांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? सर्व घाणेरडे कपडे त्यांच्या लॉन्ड्रीमध्ये आले आहेत. आणि त्यांनी धुतले आहेत. त्यांना आता नैतिक अधिकार आहेत का?. देशभक्ती, राष्ट्रवाद, त्यांच्या अंत:करणात काहीही नाही, फक्त सत्तेसाठी त्यांचे प्रेम असून भाजपचा हा ढोंगीपणा आहे, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. Thackeray vs Devendra Fadnavis

 

हेही वाचा 

Back to top button