यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, ज्या लोकांनी आम्ही गुवाहाटीमध्ये असताना महिलांची अवहेलना करणारे शब्द वापरले त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी, कोण काय आहे हे कोणी सांगायची गरज नाही. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने कोण कुठे आहे हे दाखवलेले आहे, यात ठाकरे गट सातव्या क्रमांकावर असल्याचेही ते म्हणाले. दरम्याम, शरद पवार, अजित पवार भेटीवर बोलताना ते म्हणाले की पवार कुटुंबीयांच्या भेटीकडे राजकीय घडामोड म्हणून बघू नये, ते दरवर्षी एकत्रच दिवाळी साजरी करतात. त्यांच्या भेटीत राजकीय काही असेल तर त्यावर स्वतः शरद पवार, अजित पवार बोलू शकतील, असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.