मुंबई: वर्धा येथील धरणग्रस्तांनी मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या

मुंबई: वर्धा येथील धरणग्रस्तांनी मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने मंत्रालयात आंदोलन केले. प्रत्येक प्रकल्पग्रस्तास पुनर्वसन कायद्यानुसार देय जमीन लाभ क्षेत्रात द्यावी, प्रकल्पग्रस्तास शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी आरक्षण मर्यादा १५ टक्के करावी, अन्यथा २० ते २५ लाख सानुग्रह अनुदान द्यावे, या आणि इतर मागण्यांसाठी १०३ दिवस उपोषण सुरू होते. आज (दि.२९) आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. परंतु, जाळी असल्याने कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news