चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; पाठवला बरनॉल | पुढारी

चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; पाठवला बरनॉल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे तुम्हाला जळजळ होत आहे. त्यामुळे तुम्हाला बर्नोल पाठवत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, ज्यावेळी महाराष्ट्राला अॅक्टिव्ह मुख्यमंत्र्याची गरज होती, त्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडला नाहीत. झोपेचे सोंग घेऊन कोव्हिड घोटाळे मात्र तुम्ही केले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस हे पहिले असे गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पदाची कोणतीही लालसा न बाळगता जनतेसाठी काम केले. त्यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केला. तुम्ही मात्र कधी महापालिकेचेही निवडणुक लढवली नाही आणि थेट मुख्यमंत्री झालात. तुमच्या वडिलांच्या पुण्याईमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात. यामध्ये तुमचे कर्तृत्व काय? असा सवालही चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

तुमची अवस्था आज तेलही गेले, तुपही गेले धुपाटणे राहिले, अशी झाली आहे. मुख्यमंत्री पद तर सोडाच पण तुमच्या वडिलांनी जोडलेली माणसेही तुम्हाला टिकवता आली नाहीत. तुमच्या पक्षाचे नाव आणि चिन्हही तुम्हाला टिकवता आले नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हेही वाचलंत का?

Back to top button