नेत्यांनी आपसांतील मतभेद विसरुन कामाला लागावे आणि लोकसभेच्या किमान 20 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे निर्देश खर्गे यांनी बैठकीत दिले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीप्रमाणे काँग्रेसमध्ये फूट पडू नये, यासाठी राज्यातील नेत्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. पक्षाने महाराष्ट्रापासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकाने गट – तट विसरून काँग्रेस पक्षाला मजबूत केले पाहिजे. भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी सांगितले. ज्येष्ठ नेत्यांना ठराविक लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी वाटून देण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे.