Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची मोठी टिप्पणी म्हणाले,

maharashtra political crisis
maharashtra political crisis
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीचा दुसरा दिवस आहे. शिंदे गटाकडून नीरज किशन कौल हे युक्तिवाद करत आहे. युक्तिवादा दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठी टिप्पणी केली आहे. फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडला जातोच, असे नाही. दहाव्या सूचीनुसार विचार करता दोन गट आहेतच, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. तसेच 21 जूनलाच पक्षात दोन गट पडल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis : मंगळवारी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा युक्तीवाद सुरू आहे. काल राज्यपालांचे बहुमत चाचणीचे पत्र न्यायालयाने रद्द ठरवावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून झाली होती. तर या पत्राचे शिंदेगटाकडून समर्थन करण्यात आले होते.

आज नीरज कौल यांनी सिब्बल आणि सिंघवी यांचा युक्तिवाद खोडून काढत शिवसेनेत 21 जूनलाच दोन गट पडले होते. याकडे लक्ष वेधले. तसेच त्यांनी मध्यप्रदेशच्या शिवराजसिंग चौहान खटल्याचा दाखला देखील दिला.

Maharashtra Political Crisis : कौल यांनी सांगितले की शिंदे यांना 21 जूनलाच गटनेते पदावरून हटवले होते आणि अजय चौधरी यांना नेतेपदी निवडले होते. तसेच सुनील प्रभूंना त्याचवेळी प्रतोद म्हणून नेमण्यात आले होते. यावेळी कौल यांनी पुन्हा एकदा घटनाक्रम मांडला. तसेच संजय राऊत यांनी दिलेल्या धमकीच्या वक्तव्यांची आठवण करून दिली. त्यामुळे आमदारांच्या जीवाला धोका होता, असे पुन्हा एकदा मांडले.

तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद करताना कौल म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर सदनाचा विश्वास आहे का एवढेच राज्यपालांना पाहायचे होते. यासाठी बहुमत चाचणीपेक्षा चांगला मार्ग काय असू शकतो, असा प्रश्न कौल यांनी उपस्थित केला. जेव्हा नाराजीची पत्र मिळतात तेव्हा राज्यपालांनी काय केले पाहिजे, असे म्हणत राज्यपालांच्या बहुमतचाचणीच्या पत्राचे समर्थन केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी कोणाला आमंत्रण द्यायचे हा राज्यपालांचा अधिकार होता.

Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश यांची महत्वपूर्ण टिप्पणी

दरम्यान युक्तिवादा दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी मोठी टिप्पणी केली. ज्या क्षणी तो प्रतिस्पर्धी गट आहे तेव्हा तुम्ही खरा पक्ष आहात असे तुम्ही म्हणता तेव्हा काही फरक पडत नाही इ. सर्व तारखा दर्शवितात की 10 व्या सूचीच्या अर्थामध्ये प्रतिस्पर्धी गट आहे आणि 10 व्या सूचीच्या अर्थामध्ये विभाजन आहे.

स्प्लिट असे गृहीत धरत नाही की फुटलेले सदस्य पक्ष सोडतात.10 व्या सूचीप्रमाणे सुद्धा बहुसंख्य किंवा अल्पसंख्य सदस्यांच्या बाबतीत चालते आणि 10 व्या सूचीप्रमाणे अर्जामध्ये फरक नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news