...म्हणून आमदारांचा हॉटेलात मुक्काम : संजय राऊत
मुंबई ; पुढारी ऑनलाईन भाजपचा सर्व यंत्रणांवर दबाव आहे हे स्पष्टपणे दिसतंय. भाजप संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मतांवर दरोडा पडू नये म्हणून आमदारांना हॉटेल मध्ये ठेवल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. भाजपमुळे आज देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.
आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे नेहमी भूमिपुत्रांच्या पाठीशी राहिले. आज मुख्यमंत्री आमदारांना संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्र्याचं भाषण दिशादर्शक ठरतं अस राऊत म्हणाले. विधान परिषद निवडणुकीवरून आमदारांना हॉटेल मध्ये ठेवण्याच्या प्रश्नावर राउत यांनी आमदारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचा मुक्काम हॉटेल मध्ये ठेवण्याचं सांगितलं. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.
देशाच राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभ असल्याचं सांगत संजय राऊत यांनी भाजप देशातील यंत्रणांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला.