रेल्वेच्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा केल्यामुळे दोन लाखांचा दंड

उच्च न्यायालयाचा निर्णय
Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालयFile photo
Published on
Updated on

मुंबई ः रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणार्‍या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या सतीश शहा यांनी 1947 मध्ये रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर आपला मालकी हक्क असल्याचा दावा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी पार पडली.

न्यायालयाच्या माध्यमातून आर्थिक फायदा उठवण्याचा हेतू यातून दिसून येतो, असे निरीक्षण न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच याचिकाकर्त्याला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावून याचिका फेटाळून लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news