द काश्मीर फाईल्स दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले, “शरद पवारांचा ढोंगीपणा उघडा झाला” | पुढारी

द काश्मीर फाईल्स दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले, "शरद पवारांचा ढोंगीपणा उघडा झाला"

पुढारी ऑनलाईन डेस्क : “द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगीच मिळायला नको होती. काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून भाजपा तिरस्कार पसरवत आहे”, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत मांडले, त्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे.

विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मी काही दिवसांपूर्वीच एका फ्लाइटमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पत्नीला भेटलो, त्यांच्या चरणांना स्पर्श केला. या दोघांनी माझे आणि पल्लवी जोशी यांचे चित्रपटाबद्दल अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. मीडियासमोर त्यांना काय झालं माहीत नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो”, अशा आशयाचे ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केलेले आहे.

‘दि काश्मीर फाईन्स’वर शरद काय म्हणाले होते?

काश्मिरि पंडितांची भाजपला खरोखर चिंता असेल तर त्यांनी पंडितांच्या पुनर्वसनाचे काम केले पाहिजे तसेच अल्पसंख्याकाच्या बाबतीत तिरस्कार निर्माण करण्याचे टाळले पाहिजे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर चुकीची माहिती पसरवून भाजपवाले देशात विखारी वातावरण तयार करीत आहेत.

खरे तर काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगीच मिळायला नको होती. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला कर सवलतही देण्यात आली. ज्या लोकांवर देशाची एकता टिकवायची जबाबदारी आहे, तेच लोक हा चित्रपट बघण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहेत.

काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यात आले हे खरे आहे. पण त्याच प्रकारे मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले. या वादात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना खेचले जात असल्यावर पवार यांनी खेद व्यक्त केला. व्ही. पी. सिंग यांच्या काळात पंडितांचे पलायन झाले. त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री होते, तर जगमोहन हे राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी नंतर भाजपच्या तिकिटावर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविली होती.

हे वाचलंत का? 

Back to top button