राज्याच्या अर्थसंकल्पातील २५ महत्त्वाच्या घोषणा
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे सरलेले संकट आणि पूर्वपदावर आलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प (दि. 11) सादर केला.
राज्याच्या अर्थसंकल्पातील १२ महत्त्वाच्या घोषणा
- शेतकरी कल्याणासाठी महत्त्वाची तरतूद
- हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
- हवेलीमध्ये संभाजीराजे यांचे स्मारक उभे करणार, २५० कोटी खर्च करणार
- नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान
- महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार
- शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजार अनुदान देणार
- कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी
- विकासाची पंचसूत्री करणार
- जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटी
- सहन आणि पणन विभागाला अधिक निधी
- अन्न प्रक्रिया योजना वाढवणार
- या वर्षात ६० हजार कृषी वीज पंपाना वीज देणार
- २ वर्षात अपूर्ण सिंचन पूर्ण करणार
- पुणे शहरात ३०० एकरात इंद्रायणी मेडिसीटी उभारणार
- प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्न करणार
- मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी
- २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
- थोर समाजसुधारकाच्या नावे अध्यापन केंद्र सुरु करणार
- उच्च तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार ६१९ कोटींची तरतूद
- शालेय शिक्षणासाठी २ हजार ३५४ कोटी
- पशूधनासाठी ३ फिरत्या प्रयोगशाळा उभारणार
- मोतीबिंदू शस्त्रक्रियेस अत्याधुनिक सुविधा
- नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा वापरणार
- स्टार्टअपसाठी तरुणांन विशेष निधी
- मुंबईतील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा विकास
- क्रीडा विभागाला २८५ कोटींचा निधी
- आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटींची तरतूद