चारठाणा, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर – जालना महामार्गावरील रायखेडा गावाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सुरेश नारायण हुलगुंडे याच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी वसमत तालुक्यातील बोराळा येथून ताब्यात घेतले आहे. त्याला जिंतुर न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. Parbhani murder case
जिंतूर – जालना महामार्गावरील रायखेडा गावाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या विष्णू आश्रोबा शिंदे (रा.वरुड नृसिंह ता. जिंतुर) या ४० वर्षीय व्यक्तीचा परभणी येथे उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.२०) मृत्यू झाला. दरम्यान मृताचा सोबती सुरेश नारायण हुलगुंडे याचा तीन दिवसांपासून संपर्क होत नव्हता. त्यामुळे या घटने प्रकरणी तर्कवितर्क लढविले जात होते.Parbhani murder case
घटनेच्या दोन दिवसांपूर्वी मृत विष्णू आश्रोबा शिंदे व त्याच्या मेव्हण्याचा भाऊ सुरेश नारायण हुलगुंडे (रा. पिपरी गोंडगे ह.मु, खंडाळा ता.पुर्णा) हे दोघेजण मोटारसायकलवर बाहेर गावी गेले होते. परंतु, जिंतुर – जालना रस्त्यावरील रायखेडा गावाजवळ विष्णू शिंदे एकटाच जखमी अवस्थेत आढळून आला होता. तर त्याच्या सोबत असलेला सुरेश नारायण हुलगुंडे याच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.
दरम्यान, विष्णू शिंदे यांचा चुलत भाऊ रमेश मरीबा शिंदे ( रा.वरुड नृसिंह, ता. जिंतुर) याने चारठाणा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२३) फिर्याद दिली होती. या प्रकरणी सुरेश नारायण हुलगुंडे याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या शोधात पोलिसांचे एक पथक वसमत तालुक्यातील बोराळा येथे दाखल होऊन त्याला ताब्यात घेतले. जिंतुरचे पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफने यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहेत.
हेही वाचा