परभणी : पत्नीने दुसऱ्याशी विवाह केल्याच्या विरहातून कावलगावच्या तरुणाने संपवले जीवन
पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : पत्नीने दुसऱ्याशी करुन फसवल्याच्या विरहातून कावलगाव येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. देवानंद बालाजी दमाने (वय ३० वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनोहर खुशालअप्पा दमाने यांनी या घटनेची चुडावा पोलीस ठाण्यात क्रार दिली.
यासबंधी अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील कावलगाव येथील देवानंद बालाजी दमाने (वय ३०वर्ष) या युवकाचे चार वर्षांपूर्वी वसमत येथील युवतीशी लग्न झाले होते. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार. लग्नानंनंतर काही दिवस या दोघांचा सुखीसंसार चालला होता परंतू कालांतराने या दोघामध्ये वाद होऊ लागले. या भंडणामुळे पत्नी दिड वर्षाखाली माहेरी निघून गेली. माहेरी गेलेल्या पत्नीने काही दिवसांनंतर लग्न केल्याची माहिती देवानंद दमाने यांना समजली. पत्नीने परस्पर लग्न केल्यामुळे दमाने हे गेल्या काही महिन्यापासून तणावात माहिती समोर आली. या नैराश्येतून (दि. २२ मार्च) रात्री १० वाजता घरातील टिनपत्राच्या आडूला साडीबांधून गळफास घेऊन जीवन संपवले.
सदर घटनेची माहीती मनोहर खुशालअप्पा दमाने यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर आज (दि. २३ मार्च) गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सपोनी नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह हिरक करीत आहेत.