मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केलेले मंगरूळ बु. येथील उमेदवार रावसाहेब कदम यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालेली येथील बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी आज (दि. २३) घोषीत केले.
येथील बाजार समितीमध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर २१ एप्रिलला एकूण १८ जागेसाठी उभे असलेल्या ५१ उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप केले. परंतु या निवडणुकीत उभे असलेले रावसाहेब भुजंगराव कदम यांचे २१ एप्रिलला निधन झाले.
या कारणामुळे निवडणूक रद्द करण्याची मागणी उमेदवार गणेश नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे एका अर्जाद्वारे केली होती. परंतु मृत्यूचे कोणतेही कागदपत्रे दाखल केली नसल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू होती. शनिवारी (दि. २२) कदम यांच्या मृत्यूचे मंगरूळ बु. ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र नाईक यांनी जयंत पाठक यांच्याकडे दाखल केले. यानंतर पाठक यांनी वरिष्ठांचा सल्ला घेत निवडणूक प्रक्रिया रद्द केली.
हेही वाचा