लातूर, पुढारी वृत्तसेवा : ४० वर्षापासून सत्तेत राहणाऱ्या देशमुखांनी लातूर शहरामध्ये एकही उद्योग आणण्याचे काम केलेले नाही. परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने मात्र लातूरच्या विकासात भर पाडण्यासाठी व शहरातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रेल्वे बोगी कारखाना आणण्याचे काम केलेले आहे, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
पेठ, चांडेश्वर व खोपेगाव येथे जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, रंजितसिंह पाटील कव्हेकर, ज्योतीराम चिवडे, रवींद्र कांबळे, नीळकंठराव पवार, गोपाळबुवा, सरपंच शिवाजी गायकवाड, सागर घोडके, मंदार कुलकर्णी, सिध्देश्वर उकीरडे, प्रल्हाद मोरे, नितीन पिटले, अरविंद मोरे, वसंत मोरे, श्रीहरी सादले, माधव गोमारे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
कव्हेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र केलेले आहे. मोदींनी राज्यघटनेचा सन्मान करण्याचे काम केले. परंतु, राज्यघटनेला बदलण्याचे काम काँग्रेसने जगातील विविध देशाचे युध्द व कोरोना काळातील परिस्थितीवर हिंमतीने मात करीत भारत देशाची चौफेर प्रगती करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केलेले आहे.
त्यामुळे जगात सर्वाधिक गुंतवणूक भारतात होऊन भारत सर्वाधिक गतीने प्रगती करीत असल्याचे कव्हेकर म्हणाले. प्रास्ताविक निळकंठराव पवार व मोरे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद करदुरे यांनी केले. आभार महेश बिरादार यांनी मानले.
अनेक वर्ष सत्तेत राहूनही लातुरातील सत्ताधाऱ्यांनी लातूरचा कसलाही विकास केलेला नाही. की लातूरचा शाश्वत पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे कामही केले नाही. लातूरच्या कुठल्याही प्रश्नावर भाजपा व भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करतो. असे सांगत आपल्या पाठीशी आपण सक्षमपणे उभे रहावे, असे आवाहन अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.