लातूर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागामार्फत मंगळवारी (दि.24) रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना रेड अलर्ट परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यकता असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे