

Udgir Taluka 13 villages cut off
जावेद शेख
उदगीर : उदगीर तालुक्यातील परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाने शनिवारी (दि. २७) सकाळी अनेक गावात अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील तेरा गावचा संपर्क तुटला होता, उदगीर तालुक्यातील अनेक गावात नदी नाल्यांना पूर आल्याने सततच्या या पुराच्या पाण्यात नागरिकांना दैनंदिन कामासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून सतत येणाऱ्या पुरामुळे अनेक गावच्या पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
उदगीर तालुक्यात पावसाचा धडाका सुरू असून शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला आधीच मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर आहे त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने उदगीर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील १३ गावांना उदगीर शहराला जोडणाऱ्या अनेक रस्ते बंद होते आणि एक गावच्या रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळे उदगीर शहराचा संपर्क तुटला होता, आवश्यक कामासाठी काहीजण जीव धोक्यात घालून प्रवास करत असून त्यात बऱ्याच गावात जीव धोक्यात घालून प्रवास केल्यामुळे अनेकांना धोक्याचा सामना करावा लागला.
शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस असल्यामुळे शाळा महाविद्यालय सुट्टी घोषित केल्यामुळे या पावसाच्या त्रासामुळे विद्यार्थी दूर राहिले,उदगीर तालुक्यातील पुरामुळे संपर्क बाधित गावे उदगीर ते देगलूर राज्य रस्ता उदगीर ते नेत्रगाव ग्रामरस्ता हैबतपूर पाटी ते हैबतपूर ग्रामरस्ता बोरगांव ग्रामरस्ता शेकापूर रस्ताभाकसखेडा ते नरसिंगवाडी देवर्जन ते हणमंतवाडी मोघा ते रावणगाव ग्रामरस्त रावणगाव ते शिवशंकर नगर रस्ता मादलापूर गावात जाणारा रस्ता होनिहिप्परगा जाणारा रस्ता वाढवणा ते शिवणखेड रस्ता उदगीर ते अहमदपूर (वायगाव पाटी पुढील पूल उदगीर तालुक्यातील या १३ गावाचा संपर्क तुटला होता.
तर उदगीर तालुक्यातील अनेक गावाच्या नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती असल्यास या अनेक गावची संपर्क तुटत असल्यामुळे रस्ते बंद होत आहेत त्यामुळे ग्रामस्थांची गैरसो होत आहे या तालुक्यातील अनेक नद्या वरील फुलांची उंची वाढवण्याची मागणी सातत्याने होते परंतु याकडेच सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे यंदा पावसाचा जोर अधिक असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे,उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी व वाढवणा येथील सर्वात मोठे तलाव असलेले तिरू मध्यम प्रकल्प शुक्रवार व शनिवार रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळे पूर्ण भरल्याने या तलावाच्या सांडव्यावरून अंदाजे पाच ते सहा फुट उंचीवरून पाणी वाहत आहे.
निसर्गाच्या समोर कोणाचेही चालत नाही या म्हणीप्रमाणे, निसर्गाच्या या लहरीने, या तलावावर अवलंबून असलेल्या मच्छीमार बांधवांचे मासेमारीसाठी आणलेले सर्व साहित्य व तलावात सोडलेले जाळे पूर्ण वाहून गेल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या शेकडो मच्छीमार बांधवांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले असून, भविष्यात यांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात तिरू नदीतून पाणी वाहत असल्यामुळे या तिरू नदीच्या लगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन त्यांचे, शेतातील पिके व शेतातील माती, पूर्णपणे वाहून जाऊन जमिनी खडकाळ बनलेल्या आहेत, संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी या भागातील सर्व शेतकरी व मच्छीमार ब करीत आहेत.