

Chaos and mismanagement in the Pradhan Mantri Gharkul Yojana.
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वालसावंगी- सुंदरवाडी गावात व ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या 'प्रधानमंत्री आवास योजनेचा' घरकुल योजनेत मोठा सावळा गोंधळ उडाला असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील वालसावंगीसह मोठमोठ्या गावात अनेक गावांमध्ये गावांमध्ये घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, एकाच घरात ३ ते ४ लाभार्थ्यांना घरकुलाच्या यादीत नावे आल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.
शासनाने बेघर आणि गरजू कुटुंबांना पक्के छप्पर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. मात्र, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी सह अनेक गावांमध्ये आणि दलालाच्या संगनमताने या योजनेचा पुरता बुरखा फाडला आहे. गावातील अत्यंत गरजू, भूमिहीन आणि खऱ्या लाभार्थ्यांना वर्षांनुवर्षे प्रतीक्षा यादीत ठेवले गेले आहे.
दुसरीकडे, आर्थिक देवाणघेवाण करून एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे घरकुल यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. एकाच घरात राहणाऱ्या तीन ते चार जणांना घरकुलाचा निधी वर्ग करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय, निकष धाब्यावर नियम डावलून अपात्र आणि सधन लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला गेल्याचा आरोप होत आहे. कागदोपत्री फेरफार करून निकष पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले आहेत.