जालना कारखान्याची जागा शेतकऱ्यांना द्यावी

शेतकऱ्यांची मागणी, गांधी चमन येथे उपोषण सुरू
Jalna News
जालना कारखान्याची जागा शेतकऱ्यांना द्यावीFile Photo
Published on
Updated on

The land belonging to the Jalna factory should be given to the farmers

जालना, पुढारी वृत्तसेवा : रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जागा सध्या ईडीच्या ताब्यात आहे. दुसरीकडे ईडीकडून कारखान्याच्या जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या चौकशीचे गुऱ्हाळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने कारखाना सभासद शेतकरी सर्व लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे शासनाने ईडीच्या ताब्यातून कारखान्याची जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी गांधी चमन येथे मंगळवार, दि. २७ रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

Jalna News
Jalna murder case : जालना खून प्रकरण काही तासांत दोघांना बेड्या

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी, सभासद आणि कामगारांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनात अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, लक्ष्मणराव शिंदे, कैलास फुलारी, नारायण वाडेकर, राज अहर्षि प्रल्हाद पडूळ, अरुण वझरकर, प्रल्हाद हेकाडे, सुभाष कोळकर, सतीश देशमुख, अॅड. सोपानराव भांदरगे आदी सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news