हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव

फुलोऱ्याच्या टप्प्यात फुलगळतीचा धोका वाढला
Jalna Agriculture News
हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भावFile Photo
Published on
Updated on

Pest infestation on the chickpea crop

पारध, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात तीन चार दिवसापासुन ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. सध्या हरभरा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना ढगाळ हवामानामुळे फुलगळती होण्याची दाट शक्यता आहे.

Jalna Agriculture News
Political News : नगराध्यक्ष चित्रा पवार यांच्या निवासस्थानी रावसाहेब दानवे यांची सदिच्छा भेट

काळात हरभरा हे रब्बी हंगामातील नगदी पीक असून अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आधार आहे. ऐन फुलोऱ्याच्या सूर्यप्रकाशाअभावी व हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे फुलांची गळती होत असल्याचे चित्र शेतांमध्ये पाहायला मिळत आहे.

किडीच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकास घाटे धरण्यावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा खत, बियाणे, मजुरी व औषधांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाच आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा उत्पादन घटण्याची टांगती तलवार शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. रात्रंदिवस मेहनत करून उभे केलेलं पीक डोळ्यांसमोर संकटात सापडलेले पाहणं वेदनादायक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Jalna Agriculture News
Voter Awareness : जालन्यात मतदार जनजागृती स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद

कृषी तज्ज्ञांच्या मते, असे ढगाळ वातावरण दीर्घकाळ राहिल्यास कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, हवामान लवकर सुधारावे आणि हरभरा पिकाला दिलासा मिळावा, अशीच प्रार्थना सध्या शेतकरी बांधव करताना दिसत आहेत.

शासनानेही हरभरा पिकावरील रोगाबाबत दखल घेऊन आवश्यक त्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यातुन करण्यत येत आहे.

फुलोऱ्याच्या संवेदनशील अवस्थेत शेतकऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य कीडनाशक व बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. इमामेक्टीन बेंझोएट, क्लोरॅन्ट्रानिलीप्रोलसारखी आधुनिक औषधे व कार्बेन्डाझिममॅन्कोझेबसारखी बुरशीनाशके योग्य मात्रेत वापरल्यास फुलगळती व नुकसान टाळता येऊ शकते.
- नारायण देशमुख, कृषी साहित्य विक्रेता
माझ्या मागील तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे माझ्या हरभरा पिकाच्या फुलांवर मोठा परिणाम होत आहे. पीक फुलोऱ्यात असतानाच फुलगळती सुरू झाली असून मेहनतीचं पीक हातातून जाण्याची भीती वाटतेय. खत, बियाणे, औषधांसाठी कर्ज काढून पीक उभं केलं, पण निसर्ग साथ देत नसेल तर शेतकऱ्याने कुणाकडे पाहायचं?
-संतोष तबडे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news