

Illegal Tree Felling: Forest Officials' Negligence
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला खतपाणी घालणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी मातंग मुक्ती सेनेच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, दि. २४ रोजीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण वन परिक्षेत्रातील मौल्यवान झाडांची मोठ्या प्रमाणावर बेसुमार कत्तल होत आहे. ही वृक्षतोड अवैध पद्धतीने सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे वन विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.