शिष्टमंडळाची जरांगेच्या पाठोपाठ वडीगोद्री येथील ओबीसींच्या साखळी उपोषणकर्त्यांना भेट

शिष्टमंडळाची जरांगेच्या पाठोपाठ वडीगोद्री येथील ओबीसींच्या साखळी उपोषणकर्त्यांना भेट
Published on
Updated on

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे सुरु असलेल्या ओबीसी समाजाच्या साखळी उपोषणाला राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जाता जाता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साखळी उपोषणाला भेट दिली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे. याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, राज्य सरकारची पूर्वीपासूनची भूमिका आहे की, ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. दरम्यान मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवालीत आल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news