हिंगोली : पूर्णा पाटबंधारे विभागाचे पाणीपाळीचे नियोजन नसल्याने शेतकरी संभ्रमात

हिंगोली : पूर्णा पाटबंधारे विभागाचे पाणीपाळीचे नियोजन नसल्याने शेतकरी संभ्रमात
Published on
Updated on

वसमत; पुढारी वृत्तसेवा : वसमत विधानसभा संघातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांच्या पाणी पाळी (रोटेंशन) साठी शिवसेनेचे उपविभागीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान खरीप हंगामा संपवून हिवाळ्यातला रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकरी कामाला लागला आहे.

संबंधित बातम्या

येलदरी -सिध्देश्वर -इसापूर धरण यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. पण पूर्णा पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियोजन अद्याप जाहीर करण्यात आले नसल्याने तालुक्यातील शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पाण्याअभावी कोणते पीक घ्यावे, ऊस लागवड कोणती करावी या संभ्रमात शेतकरी आहेत. दरम्यान पूर्णा पाटबंधारे विभाग यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नाही.

यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना वेळेत पाणीपाळी देण्याचे जाहीर करून दिलासा मिळाला पाहिजे यासाठी पूर्णा पाटबंधारे विभागाने लवकर नियोजन करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पूर्णा पाठबंधारे विभाग वसमत यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर तालुका प्रमुख राजु दादा चापके, विधानसभा प्रमुख मच्चिंद्रनाथ सोळंके, माजी सभापती रामकिशन झुन्झुर्ड, शहर प्रमूख प्रभाकर क्षीरसागर, माजी शहर प्रमूख बाबा अफूने, राहुल राठोड, विक्की कदम, नवनाथ खराटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news